मालगाडीच्या धडकेने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीची धडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास घडली. बालाजी भानुदास कोटावार (५०) असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे.बालाजी कोटावार रा. डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर हे रेल्वे मधील एस अँड टी विभागात कार्यरत असून ते आज सकाळी ७.३० ते ८ वाजता आपली कामगिरी बजावत असताना फलाट क्रं. ५ मध्ये काझीपेठ एंड कडे त्यांना मालगाडीची धडक बसली. त्यात त्यांचे पाय कटून तीव्र रक्त स्त्राव झाले.त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. पुढील तपास बल्लारशाह रेल्वे पोलिस चौकी चे पोलिस हवालदार धीरज घरडे,पोशि राजेंद्र फटिंग करीत आहे.
Related News
वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई; अवैध विदेशी दारू वाहतूक करणारे दोन आरोपी जेलबंद
3 days ago | Naved Pathan
ग्रामीण रुग्णालयासमोरून दुचाकीची धाडसी चोरी,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
5 days ago | Sajid Pathan
गाडीचा कट मारल्याच्या किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला धारदार हत्याराने युवकाची हत्या आरोपी फरार
8 days ago | Sajid Pathan
दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई, मोटारसायकल जप्त; गुन्हा दाखल
10 days ago | Naved Pathan
आंबेडकर जयंतीत चंद्रपूरात पहिल्यांदाच रक्तरंजित घटना,रॅलीदरम्यान तरुणाची हत्या,एक जखमी
16-Apr-2026 | Sajid Pathan