मालगाडीच्या धडकेने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीची धडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास घडली. बालाजी भानुदास कोटावार (५०) असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे.बालाजी कोटावार रा. डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर हे रेल्वे मधील एस अँड टी विभागात कार्यरत असून ते आज सकाळी ७.३० ते ८ वाजता आपली कामगिरी बजावत असताना फलाट क्रं. ५ मध्ये काझीपेठ एंड कडे त्यांना मालगाडीची धडक बसली. त्यात त्यांचे पाय कटून तीव्र रक्त स्त्राव झाले.त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. पुढील तपास बल्लारशाह रेल्वे पोलिस चौकी चे पोलिस हवालदार धीरज घरडे,पोशि राजेंद्र फटिंग करीत आहे.
Related News
सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए यातायात नियमों का पालन आवश्यक” — सहायक फौजदार रियाज खान
30-Nov-2025 | Sajid Pathan
दारू के नशे में कार चालक ने बाइक को मारी टक्कर, दो युवक गंभीर रूप से घायल
24-Nov-2025 | Sajid Pathan
मंदिरात चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद – वर्धा गुन्हे प्रगटीकरण पथकाची यशस्वी कामगिरी
24-Nov-2025 | Sajid Pathan